Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
HomeChandal dosha

चांडाळ योग



 
By clicking on below button I agree T & C and Astrovidhi can call me for further consultation.

काय आहे चांडाळ योग?

गुरु ज्ञान एवं बुद्धि प्रदान करत असतो आणि राहु छाया ग्रह आहे जो सदैव अनिष्‍ट फळ देतो. अशी मान्यता आहे कि गुरु देवांचे गुरु आहे आणि राहु राक्षसांचे गुरु आहे. या दोन्ही ग्रहांचा कुठल्याही प्रकारे संबंध जुळला तर गुरु चांडाळ योग निर्माण होतो. कुंडलीत गुरु आणि राहुची युति झाल्या वर हा योग बनतो. राहुच्या प्रभावात आल्या नंतर गुरु अनिष्ठ फळ देण्याची सुरुवात करतो. चांडाळ योग चांगला मानला जात नाही तुच्छ मानला जातो. अशी लोकांची मान्यता आहे की या योगाची सावली देखील या संसाराला व गुरूला अशुद्ध करू शकते.

प्रभावित व्यक्ती-

जसे आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले आहे कि चांडाळ योग असलेला व्यक्ती आपल्याच गुरुच्या प्रती ईर्ष्‍या भाव ठेवतो. या चांडाळ योगाच्या प्रभावा मुळे व्यक्तीचे मन दुसऱ्या स्री वर येते आणि त्याचे चारित्र्य खराब होण्याची सुरुवात होते. याच्या अतिरिक्त असा व्यक्ती चोरी, जुगार, सट्टा, अनैतिक कार्य, नशा आणि हिंसक कार्यात लिप्‍त राहतो.

प्रभाव-

कुंडलीत चांडाळ योग बनल्या नंतर व्यक्ती आपल्या गुरूचा अनादर करतो आणि गुरुच्या प्रती ईर्ष्‍या ठेवतो. जर कुंडलीत राहु मजबूत स्थितित असेल तर व्यक्ती आपल्या गुरूचे जे काम असेल तेच काम तो करतो परंतु आपल्या गुरुचे जे सिद्धांत आहेत त्याची अवहेलना करतो. शिष्य आपल्या गुरूच्या कामाला चांगल्या प्रकारे करून त्या कामाला आपलस करून प्रस्तुत करतात तथा शिष्या समोर आपल्या गुरुचा अपमान होत आहे हे पाहून देखील शिष्य चुपचाप हे सगळ पाहात असतात. याच्या विपरीत दुसरी कडे राहु कमजोर असल्याच्या स्थितित व्यक्ती आपल्या गुरुचा आदर, सन्मान करतात. राहु समोर गुरूचा प्रभाव खूप कमजोर पडतो. गुरू,राहुच्या दुष्‍प्रभावाला कमी करण्यात असफळ होतो.

उपाय-

  • राहु ग्रहाचा जप-दान केल्यानी लाभ होईल.
  • गायला चारावे तसेच नियमित हनुमान चाळीसाचा पाठ करावा.
  • कुठलाही महत्वपूर्ण निर्णय घेण्या अगोदर घरातील मोठ्या माणसांचा सल्ला घ्यावा.
  • आपल्या वाणी वर नियंत्रण ठेवावे आणि प्रसन्न राहावे.
  • वयस्कर माणसांचा आदर-सन्मान करावा व आपल्या आई-वडिलांचा आदर करावा.
  • आपल्या गुरुची निस्वार्थ भावाने सेवा करावी.
  • दररोज हळद आणि केसराचा टिळक कपाळा वर लावला तर लाभ होईल.
  • गरीब मुलांच्या शिक्षणात त्यांची मदत करावी.
  • गणपती बप्पा आणि देवी सरस्वती यांची पूजा-अर्चना करावी व मंत्र जाप करावा.
  • वडाच्या झाडाला कच्चे दूध घालावे आणि केळीच्या वृक्षाची पूजा करावी.
 
DMCA.com Protection Status